पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ज्योतिष आणि कर्मफळ

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ अर्थ: तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे , त्याच्या फळांवर नाही ; म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको ; ( पण) कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको. भगवतगीतेच्या दुसर्‍या अध्यायातील हा श्लोक आहे. भगवंतानेही स्पष्टपणे कर्म करण्यास सांगितलं आहे. जोपर्यंत आपण कर्म करणार नाहीत तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही.                    ज्योतिषशास्त्र हे आपल्याला योग्य कर्म करण्याची दिशा दाखवणारं शास्त्र आहे. सामान्य माणसाला वाटतं की आकाशातील ग्रह-तारे आपलं भविष्य कसं ठरवू शकतात ? पण आकाशातील ग्रह-तारे हे आपल्याला वर्तमानात कोणता मार्ग अवलंबला पाहिजे यासाठीचा प्रकाशमार्ग दाखवत असतात. ज्या काळात आजच्या भौतिकशास्त्राचा किंबहुना दुर्भिणीचाही शोध लागला नव्हता त्याकाळात आपल्या ऋषीमुनींनी ज्योतिषशास्त्र विकसित केलं आहे. त्याअनुसार भविष्यातील परिस्थितीचा अंदाज घेता येतो आणि वर्तमानात काय निर्णय घ्यावेत हे समजून येतं...

वास्तु: भाड्याचे घर व गृहप्रवेश

एखाद्या वास्तुमध्ये दोष असतो म्हणजे काय ? याबद्दल आपण आधीच्या ब्लॉगमधून काही अंशी जाणून घेतलं आहे. पण वास्तुदोषाचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात याची तीव्रता आज आपण समजून घेणार आहोत. वास्तुशास्त्राबद्दल बोलत असताना आपण दहा दिशा , गुरुत्वाकर्षण , वैश्विक ऊर्जा अशा अनेक घटकांचा विचार करत असतो. यातील प्रत्येक दिशेशी एक तत्व निगडीत आहे. प्रत्येक ऊर्जेचा मानवी शरीर व मनावर थेट परिणाम असतो. जर यामध्ये असंतुलन निर्माण झालं तर त्याचे विपरीत परिणाम वास्तुमध्ये राहणार्‍या मानवांवर होत असतात. कुटुंबाला सुख लाभतच नाही , कुठल्याच क्षेत्रात यश येत नाही , घरातील तरुण पिढी वाईट मार्गावर जात असणे , सतत आर्थिक नुकसान होत राहणे , हितशत्रूंपासूनत्रास होणे अशा समस्या ज्या सर्वसामान्य कुटुंबात सहजासहजी दिसून येत नाहीत त्या वास्तुदोष असलेल्या कुटुंबात दिसून येतात. आधी सांगितल्याप्रमाणे , आग्नेय ही अग्नि तत्वाची दिशा आहे , ईशान्य जल तत्वाची आहे तसं सर्वच दिशेला पंचमहाभूतांतील एका तत्वाशी बांधलं गेलं आहे. त्या दिशेत जर गंभीर दोष असतील तर त्याचे अतिशय गंभीर परिणाम भोगावे लागतात. खासकरून घरातील सदस्यां...

ज्योतिष आणि गैरसमज

आपण याआधीच्या ब्लॉगमधून ज्योतिष म्हणजे काय याबद्दल माहिती घेतली होती. ज्योतिष या शब्दाची फोड ज्योत + भविष्य अशी करता येईल. याचा अर्थ या शास्त्रातून भविष्याचा वेध घेता येतो हे स्पष्ट आहे. पण चित्रपटात दाखवतात तसं ही काही Time Machine नाही की आपण आरपार पाहू शकतो. ज्योतिषशास्त्रात अनेक बाबींचा अभ्यास करून जे निष्कर्ष काढतात तेसंकेत असतात , अंदाज असतात. आयुष्य खूप मोठं आहे. त्यात स र्वांनाच सुखाचा हव्यास आहे. मग या दीर्घ आयुष्यात सुखाकडे वाटचाल करायची असेल तर योग्य मार्गदर्शन असायलाच हवं. भविष्यात काय वाढून ठेवलं आहे , कोणते धोके असू शकतात , काय संधी असू शकतात , कोणत्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे , कुठे ठेच लागू शकते आणि कुठे जरासा विसावा घेतला पाहिजे हे सर्व ज्योतिषशास्त्राच्या आधारे जाणून घेता येतं. एक उदाहरण द्यायचं झालं तर , एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीच्या अभ्यासाअंती असा निष्कर्ष निघू शकतो की येणार्‍या काळात ग्रहमान प्रतिकूल असून पोट , हृदय संबंधित विकार उद्भवू शकतात तर साहजिकच ती व्यक्ति काळजी घेऊन ते टाळू शकते. किंवा जर ग्रहमान अनुकूल असेल आणि पत्रिकेत धनलाभ योग दिसून येत ...

वास्तुशास्त्र: धन आणि आरोग्य : भाग २

आर्थिक सुख मिळाल्यानंतर आरोग्यचं सुखही अतिशय आवश्यक आहे. आपल्याकडे पैसा कितीही असूद्या पण जर त्याचा उपभोग घेण्यासाठी उत्तम आरोग्य नसेल तर सर्वकाही निष्फळ आहे. जीवन हसत हसत जगून समाधानाने मृत्यू येणे हीच सुखी आयुष्याची व्याख्या आहे. यामध्ये संपन्न व दोषमुक्त वास्तु सर्वात महत्वाची भूमिका निभावते असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. वास्तूचा सर्वाधिक परिणाम होत असेल तर तो म्हणजे त्या वास्तूत सतत निवास करणार्‍या मानवी शरीर व मनावर. विविध दिशेने येणार्‍या सकारात्मक-नकारात्मक वैश्विक ऊर्जा, गुरुत्वाकर्षण हे वास्तूत राहणार्‍या शरीर-मनावर परिणाम करतात आणि त्यातूनच शारीरिक व मानसिक आरोग्याची जडणघडण होत असते.  काही घरांमध्ये सतत आरोग्याच्या तक्रारी सुरू असतात. एक झालं की दुसरं दुखणं सुरूच असतं. दुर्दैवाने अकाली मृत्यूही होतात. घरात सतत वाद-विवाद होत असतात. मानसिक अस्वास्थ्य जाणवत असतं. असं होऊनही माणसं वर्षानुवर्षे ते निमूटपणे सहन करतात. पण त्यावर सोपे उपाय अवलंबून आहेत. त्यात खूप खर्च करणे अथवा जागेची तोडफोड करणे अशी आवश्यकता नाही. आपल्या वास्तूत छोटे-मोठे बदल करून आणि काही सुचना...

वास्तुशास्त्र: धन आणि आरोग्य: भाग १

वास्तुशास्त्र म्हणजे काय याची माहिती आपण यापूर्वीच्या ब्लॉगमधून घेतली आहे. आपल्या आयुष्यातील अनेक छोट्या-मोठ्या समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी सामान्य माणूस संपन्न वास्तूचा अट्टहास धरत असतो. ज्यावेळी त्याला अडचणी येतात किंवा सर्व सुरळीत सुरू असताना काही अशुभ होऊ नये या चिंतेने तो वास्तुशास्त्र या विषयाकडे वळतो. आरोग्य , धन , शिक्षण , प्रतिष्ठा , करियर , विवाह असे अनेक विषय आपण वास्तुच्या अनुषंगाने अभ्यास करू शकतो. जर त्यासंबंधी काही समस्या असतील तर त्यावर उपायही करू शकतो. आपली वास्तु सुख देणारी असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. आणि सुखाची व्याख्या ही आर्थिक व आरोग्याच्या सुखाच्या जवळ येऊन थांबते. आपल्याकडे धनसंपत्ती असावी आणि उत्तम आरोग्य असावं जेणेकरून आपण सुखी होऊ शकतो असं सर्वांनाच वाटत असतं. त्यामुळे आपण धन आणि आरोग्य यांचा वास्तूशी संबंध काय असतो , शिवाय धन व आरोग्य प्राप्तीसाठी वास्तु कशी असावी , त्यात छोटे-मोठे काय बदल करावेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आधी आपण धन या विषयावर जाणून घेऊ! आर्थिक सुबत्ता ही आजच्या काळातील गरज आहे. वाढणारी महागाई , शहरी जीवनशैली , ...

वास्तुशास्त्र: सुखी जीवनाचं सूत्र

प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात असतो. आयुष्यभर हा शोध सुरूच असतो. पण आयुष्यात एकाच वेळेस सर्व सुख मिळत नसल्याने माणूस समाधानाने जगू शकत नाही. आरोग्य , धन-संपत्ती , नातेसंबंध , शिक्षण या सर्व गोष्टी एकाच वेळेस मिळत नाहीत. एक आहे तर दुसरं नाही अशी अवस्था असते. त्यामुळे समाधानाने जगता येत नाही. पण समाजात असे काही व्यक्ति असतात , अशी काही कुटुंबं असतात ज्यांना समाधान लाभतं! त्यांच्या अशा निस्सीम जगण्याच्या मागे अनेक कारणं असू शकतात . पण जर याचा सखोल विचार केला तर त्यामागे एक परिपूर्ण वास्तु असल्याचं आढळून येईल. समाधानी आयुष्यासाठी निरोगी शरीर , निरोगी मन आणि पूर्ण कार्यशीलतेने काम करणे महत्वाचं आहे. जर आपली वास्तु दोषमुक्त असेल तर आपण सुखी जीवनाच्या मार्गावर असतो असं खात्रीने म्हणता येईल. ज्या ठिकाणी आपण बहुतांश वेळ राहतो , जेवतो , झोपतो , अभ्यास करतो , महत्वाचे निर्णय घेतो ती वास्तु जर आपल्यावर प्रभाव टाकणारी असेल तर ती निर्दोष व परिपूर्ण असलीच पाहिजे. आपण आधीच्या ब्लॉगमध्ये वास्तुशास्त्र म्हणजे काय हे जाणून घेतलं होतं. माणसाने स्वतःच्या निवार्‍यासाठी एखादी झोपडी जरी बनवली असेल...